हिंदू (भालचंद्र नेमाडे) hindu
# हिंदू # जगण्याची_समृद्ध_अडगळ २०१४ या वर्षी ज्ञानपिठ पुरस्काराने सन्मानित झालेलं हे मराठीतील चौथं साहित्य. तत्पूर्वी १९७४साली ययाती (वि. स. खांडेकर), १९८७ साली विशाखा कवितासंग्रह (कुसुमाग्रज), २०१३ साली अष्टदर्शने(वि.द. करंदीकर) हे साहित्य या पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. ____हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (अडगळ हा शब्द खटकला पण...) कशी असू शकते हे या कादंबरीत उलगडत जाते. खंडेराव स्वतःशीच संवाद साधून झोपी जातो. स्वतःशीच बोलू लागतो. आणि त्याला पुन्हा दिसू लागतात, त्यांनी संशोधित केलेल्या खाणाखुणा. व्यासपीठावर पुरातत्वज्ञ मिस्टर म्हणून अध्यक्ष त्यांची ओळख करून देतात. आणि त्यांचा शोधनिबंधाची माहिती उपस्थितांना करून देण्यास सांगतात. तदनंतर शहरी भाग आणि ग्रामीण भाग याच विश्लेषण त्यांनी केले आहे. खान्देशातील मोरगाव हे खंडेरावांचे गाव. त्यात त्यांचा लाहोर ते खान्देशातील मोरगावाचा प्रवास, पाकिस्तान ते भारत, आठवणींच्या वर्तमानात होणारे सारे बदल त्याचा जीवनावर होणारे परिणाम, समाजातील खाणाखुणा, जाती जमाती, शोषण, ऐतिहासिक, लोककथा यांचा जीवनावर होणारा परीणाम, साऱ्यांचा गुंता कसा प्रबळ ह...
Comments
Post a Comment