GAMMAT
तर... गम्मत अशी झाली, आज मी अंधेरीला चाललो होतो. 9.05 च्या बोरिवली लोकलने मी जाणार होतो. मी तिकीट काढून पालघराला प्लॅटफॉर्म 2 वर थांबलो होतो. त्या आधीची वसई लोकल माझ्या समोर निघून गेली. मागून आवाज आला, "अरे नितेश भाऊ, कुठे चाललास..?" मी म्हंटल "अंधेरी. अन तू कुठे रे अभि Abhi ..." "अरे वसईला चाललो..." " आत्ताच गेली की वसई..! आणि असा वैतागलेला का दिसतोस..??" "हो ना रे, त्या म्हातारीने सकाळ सकाळ सटकवली यार..!" "का काय झालं..??" "चल आधी सँडविच खाऊ चल, तुला सांगतो." "ये मामा दोन टोस्टेड दे रे" "अरे काय झालं काय..." " अरे लगबगीने मी घरून आलो, गाडी पकडायची म्हणून... तसा उशीरच झालेला रे... त्यात सकाळची वेळ, तुला माहीत आहे ना किती रांग असते ती... "हो ना..." तोवर मामा हातात प्लेट घेऊन "येलो आपका सँडविच" त्या प्लेट घेतल्या आणि आम्ही खाऊ लागलो. मी म्हणालो "हा तर पुढे..." "हा... तर, नशीब मित्र भेटला, गाडीची वेळ झालेली... त्याला म्हंटल माझं एक वसई रिटर्न काढ... आणि मी...