बारी (रणजित देसाई) bari ranjit desai
#बारी - रणजित देसाई
साधे सरळ आयुष्य किती नेटानं जगलो मी
नवी आली क्रांती अन किती फरफटलो मी
नवी आली क्रांती अन किती फरफटलो मी
बारी ही रणजित देसाई यांची पहिली कादंबरी. वी.स. खांडेकरांनी तिचं प्रास्ताविक लिहिलंय. त्यांच्याच शब्दात म्हणायचं तर... लेखक व त्याच्याशी अपरिचित असलेला वाचक यांच्यात जो अन्तरपाट असतो तो मंगलाष्टके म्हणून दूर करण्याकरिता प्रस्तावनकाराची आवश्यकता असते. आणि ते अगदी सूचक पद्धतीने प्रस्तावनेत मांडले आहे.
कादंबरी बद्दल म्हणायचं झालं तर... एक बेरड समाजातील तेग्या या कादंबरीचा नायक आहे. यंत्रयुगाकडे वाटचाल करतांना, त्याच्या समाजातील, जीवनातील होणाऱ्या बदलाची आणि त्या बदलामुळे शेवटी सर्वस्व हिरावून गाव तरुणमुक्त होते आणि गावात सरतेशेवटी म्हातारेच कुढत राहतात असा केविलवाणी प्रवास, बेरड जमातीचे परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि या जमातीच्या भवितव्याची काळजी या कादंबरीत आहे.
आयुष्य संपणार कधीतरी, मी जाणूनच आहे
तूर्त ओझे आठवणींचे फार मज छळते आहे
तूर्त ओझे आठवणींचे फार मज छळते आहे
रानात पलोत्याच्या उजेडात दिसलेली नागी, त्याच्या मनाला भुरळ घालते. लग्नास तयार नसतानाही, तिच्या बाप संमतीने पळवून आणतो आणि लग्न करतो. दरोडा टाकण्याचा परंपरागत धंदा, आणि गावाचा नाईक असलेला तेग्या, एकवार चुकून सावकाराच्या बैलगाडीवरच दरोडा घालतो. ज्याकडे तो इमाने चाकरी करत होता. अर्थात ते कळल्यावर काही नुकसान न करता तो गाड्या सोडतो. पण नियती त्याच्याकडून त्याची खूप मोठी किंमत वसूल करते. सावकार त्याला शपतेत अडकवून, तुला काहीच होणार नाही ह्या शर्तीवर पाटलाचा खून करवतो.
भोळ्या तेग्याचा जीव भांड्यात सापडतो आणि तो खून करतो. त्यात त्याचा मित्र पण ओढला जातो. त्याच्या पच्छात गावाचा नाईक त्याचा मुलगा ईश्वरा असतो. अकरा वर्षे कारावास भोगून येतो तेव्हा गावाचं चित्र पालटलेलं असतं. सावकाराला जाब विचारायला जातो आणि सावकाराची बायको त्याला शपतेत अडकवते. पोराचं लग्न करतो आणि त्याच दिवशी त्याच्या घराला आग लागते आणि नागी त्यात सुनेला वाचवून स्वतः मात्र जळून मरते. जंगलात एक दिवस वणवा लागतो तो युक्तीने सारेजण विझवतात. आणि तेव्हा पासून त्यांच्या आयुष्यात एका तंत्रयुगाची एन्ट्री होते. त्यांचे आयुष्य एक अदृश्य वणव्यात दिवसोदिवस होरपळत जाते. हळूहळू गावाचं गावपण राहत नाही. गावात माणसं राहत नाही. आणि त्यांनी जीवापाड जपलेलं जंगलही बोडकं होऊन जातं.
शब्दाला जागलो मी, काय माझा गुन्हा
काळोखच राहिला, पदरी माझ्या पुन्हा
___नित 9637138031
नितेश पाटील (धनसार, पालघर)
काळोखच राहिला, पदरी माझ्या पुन्हा
___नित 9637138031
नितेश पाटील (धनसार, पालघर)

Comments
Post a Comment